२ महिने मासेमारी बंद; ऑगस्ट मध्ये सुरुवात

उरण : महाराष्ट्र शासनाने १ जून पासून ३१ जुलै २०२४ पर्यंत खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी घातल्याने मासळीची आवक घटली असून, मासळीचे भाव चांगलेच कडाडले आहेत. त्यामुळे मासळीचे लिलाव बंद होऊन कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. मासेमारी बंदीमुळे कोळी बांधवांनी त्यांच्या बोटी समुद्र किनारी आणून शाकारणी केली आहे.

उरण तालुवयातील करंजा, मोरा, रेवस, मुळेखंड, खोपटा, वशेणी, गव्हाण आदि ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर बोटी नांगरुन ठेवण्यात  आल्या आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये पाच हजारापेक्षा अधिक मासेमारी नौका आहेत. त्यामध्ये काही नौका यांत्रिकी तर काही बिगर यांत्रिकी आहेत. ३१ मे मासेमारी हंगामाचा शेवटचा दिवस होता. आता पुढील दोन महिने या बोटीत किनाऱ्यावर विसावणार आहेत. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात होणार आहे.

 बदलते हवामान, सांडपाण्यामुळे समुद्रात निर्माण होणारे प्रदूषण, जेली फिश अशा अनेक समस्यांमुळे मासेमारीवर परिणाम होतो. त्यामुळे मासळीच्या उत्पादनात घट होत असतानाही रायगड जिल्ह्यातील मच्छीमार सर्व संकटांवर मात करत मासेमारीचा व्यवसाय करत आहेत. जून महिन्यात पावसामुळे उधाणाबरोबरच वारा, वादळ मोठ्या प्रमाणात येते. मासेमारीसाठी गेलेल्या बोटी अडकून पडण्याचा धोका अधिक असतो. मासेमारी बंदीमुळे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. मासेमारी बंदीमुळे मच्छीमारांनी नौका किनारी लावण्यास सुरुवात केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 कल्याण तालुक्यात नैसर्गिक आपत्ती निवारण यंत्रणा राम भरोसे?