महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ'च्या वतीने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या क्षमता वाढीअंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक' प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा
मुंबईतील पायधुनी येथील घटनेच्या वृत्तांकनातून प्रसारमाध्यमांची उत्तरदायित्व शून्यता अधोरेखित झालेली आहे . एकाच कुटुंबातील ४ सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांनी त्या दिवशी बिर्याणी व कलिंगड खाल्ले होते. पण कुठलाही अधिकृत अहवाल नसताना प्रसारमाध्यांनी सदरील मृत्यूस कलिंगडाची विषबाधा कारणीभूत असल्याच्या बातम्या सातत्याने प्रकाशित केल्या. सुरुवातीला केवळ शंकेच्या आधारे काही खाद्यपदार्थांवर आरोप करत बातम्या प्रसारित झाल्या. त्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये कलिंगडाविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकरी आणि व्यापारी वर्गाला बसला. नंतर अधिकृत तपासणीत त्या शंकांना कोणताही आधार नसल्याचे समोर आले, मात्र तोपर्यंत नुकसान झालेलेच होते.
Join our newsletter and get updates in your inbox. We won’t spam you and we respect your privacy.